google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण निबंध मराठी माहिती | Netaji shubhash Chandra bose jayanti 2022
Type Here to Get Search Results !

नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण निबंध मराठी माहिती | Netaji shubhash Chandra bose jayanti 2022

 नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण निबंध मराठी  माहिती | netaji shubhash Chandra bose speech essay in marathi | नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती मराठी


नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण निबंध मराठी  माहिती



नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती मराठी | netaji subhash chandra bose information in marathi


नमस्कार मित्रांनो आज आपण देशाला लाभलेले थोर व्यक्तीमत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भाषण, निबंध, कविता, सुत्रसंचलन, शुभेच्छा, स्टेटस आणि विचार ही सर्व माहिती बघणार आहोत.

 "तुम मुझे खून दो,मै तुम्हे आजादी दूंगा" 

असा नारा देत भारतीयांना इंग्रजांच्या विरुद्ध पुकारलेल्या त्यांच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणारे स्वातंत्र सेनानी यांची आज जयंती आहे आणि याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला पुढे पहायला मिळेल.



 🔯नेताजी सुभाषचंद्र बोस निबंध मराठी |Netaji Subhash Chandra Bose Essay In Marath

नेताजी सुभाषचंद्र बोस :

भारताला स्वतंत्र करण्यासाठी मोलाचे योगदान देणारे आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणारे तसेच "जय हिंद" आणि "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा" ही जबरदस्त घोषणा देऊन जगाचे लक्ष वेधून घेणारे बंगालचे सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस हे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा प्रांतातील कटक या शहरात झाला. नेताजींनी  कलकत्त्याला आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले.


सुभाषचंद्र बोस यांनी कुशाग्र बुद्धिमत्ता व कठोर परिश्रमाला अभ्यासाची जोड दिली आणि नेताजी सुभाष चंद्र बोस हे इंग्लंडला जाऊन आय. सी. एस झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांची नोकरी पत्करली पण त्यात त्यांचे मन रमले नाही. तेथील नोकरी सोडून ते मायदेशी परतले. मायदेशी आल्यानंतर गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देणारे ते पहिले आय.सी.एस्. अधिकारी होते.

भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेसबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अनेक चळवळीत भाग घेतला. नेताजींवर अनेक क्रांतीकारी विचारांचा प्रभाव होता. त्यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेटत्या मशाली होत्या.नेताजी सुभाष बाबूंनी स्वतंत्र "आझाद हिंद सेना" स्थापन केली.आझाद हिंद सेनेचे सर सेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने व आदराने नेताजी म्हणू लागली. नेताजीं सुभाषचंद्र बोस यांनी "झाशीची राणी" नावाचे स्त्री सैनिकांचे पथकही उभारले. त्यांनी दिलेली 'जय हिंद' ही घोषणा आज सर्वतोमुखी झाली आहे.

१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान प्रवास करीत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला अपघात झाला. स्वातंत्र्य सेनानी सुभाषबाबूंची स्वातंत्र्याच्या होमकुंडात आहुती पडली. प्रखर बुध्दीमत्ता, साहस, अलौकिक देशभक्ती हे सुभाषबाबूंचे गुण भारतीय जनतेच्या मनात कायमचे "कोरले गेले. पुढे दोन वर्षांनी देश स्वतंत्र झाला पण देशासाठी जीवाचे रान करणारा हा सूर नेता कायमचा आपल्याला दुरावला.


🔯नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण मराठी | Netaji Subhash Chandra Bose speech in marathi

नमस्कार मित्रांनो आज 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे आणि आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर भाषण वाचणार आहोत.

 "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा" 

ही लोकप्रिय घोषणा देणारी व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या जिवाची पर्वा न करता संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित करणाऱ्या नेताजी चंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. नेताजी सुभाष चंद्र बोस हे इंग्लंडला जाऊन आय. सी. एस झाले. जालियनवाला बाग हकीकत वाचून ते विलक्षण अस्वस्थ झाले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी चित्तरंजन दास यांच्या मार्गदर्शनाखाली देशसेवेचे कार्य केले.

 सुभाषबाबूंनी वेळोवेळी सत्याग्रहाच्या चळवळीत भाग घेऊन अनेक वेळा तुरुंगवास भोगला. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीसाठी यापेक्षा जहाल मार्ग स्वीकारला पाहिजे. क्रांतीला आता पर्याय नाही प्रसंगी ती क्रांती सशस्त्रही असेल असे त्यांचे मत आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापुरात अर्जी हुकूमत-ए आझाद हिंद ची स्थापना केली. सुभाष चंद्र बोस यांनी दिलेला "जय हिन्द" चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ६ जुलै १९४४ रोजी "आझाद हिंद" रेडिओ वरचे आपले नेताजींनी गांधीजींना उद्देशून केलेले भाषण या भाषणात गांधीजींचा "राष्ट्रपिता"असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशाप्रकारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम, महात्मा गांधी यांना "राष्ट्रपिता" असे संबोधले. 

 "तुम मुझे खून दो,मै तुम्हे आजादी दूंगा" 

असे म्हणत भारतीयांना इंग्रजांच्या विरुद्ध पुकारलेल्या त्यांच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. 


प्यारा सुभाष, नेता सुभाष

भारत भू का उजियारा था !

पैदा होते हि गणिको ने

जिसका भष्य लिख डाला था !!


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल असे सांगण्यात येते की १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजीचे निधन झाले परंतु त्यांचा मृतदेह सापडला नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू एक रहस्य बनून राहिला आहे. अशा या महान व्यक्तिला माझा कोटी कोटी प्रणाम.


🔯नेताजी सुभाषचंद्र बोस कविता शायरी हींदी | Netaji Subhash Chandra Bose poem shayari in hindi

स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होऊन अनमोल अशी भुमिका बजावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आपण शुभेच्छा संदेश म्हणून कविता बघणार आहोत.

नेता जी के बोल बडे है अनमोल !
जिन्दगी की कसोटी पर, तोल सके तो तोल !


देश की सीमा से बाहर रहकर, देश पर उपकार किया भारी !
अपनो से अपमान सहकर भी, राष्ट्रभक्ति रखी थी जारी!


उनकी वाणी में कितनो ने जहर दिया था घोल ! 
जिन्दगी की कसोटी पर तोल सके तो तोल !


रक्त शिराओ मे उनकी, देखो तो कैसे खोला था !
विदेश की धरती पर जाकर, जय हिन्द का नारा बोला था !


नेता जी के पराक्रम का कोई कर सका न तोल !
जिन्दगी की कसोटी पर, तोल सके तो तोल !



🔯Netaji Subhash Chandra Bose slogan |नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या घोषणा :

  • "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा"

  •  तुम्ही बलिदान देण्यास तयार राहा. मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन.

  • स्वातंत्र्य मिळत नाही, मिळवावं लागत.


🔯नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती शुभेच्छा संदेश स्टेटस विचार मराठी | Netaji Subhash Chandra Bose wishes quotes status in marathi

सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आपण शुभेच्छा संदेश स्टेटस विचार मराठी मध्ये बघणार आहोत. हे विचार आपण वाचल्यानंतर यातुन नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि हे विचार आपण आपल्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना what's up, Fecebook, twitter वर शेअर करू शकता किंवा what's up स्टेटस ठेऊ शकता. इतरांना नक्की शेअर करा.


🔯 नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती २०२२

यशाचा दिवस दुर असेल पण तो येईलच हे मात्र नक्क.

 

🎯 Netaji Subhash Chandra Bose jayanti 2022   

  कधीही अधीर होऊ नका, तसेच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं, ते तुम्हाला 1-2 दिवसातच मिळेल.

 

💠 Netaji Subhash Chandra Bose jayanti shubhechha

एक व्यक्ती, एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.

 

🔶 नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती शुभेच्छा संदेश  

    जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस सपेल.


♦️ नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती स्टेटस मराठी 

    आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरीही आपण पुढे गेलंच पाहिजे.

🌐 shubhas chandra bose quotes in marathi 

 आपल्याला फक्त कार्य करण्याचा अधिकार आहे, कर्म हेच आपलं कर्तव्य आहे, कर्माच्या फळाचा स्वामी देव आहे, आपण नाही.


🔵 Netaji Subhash Chandra Bose Speech in marathi

      मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो आहे तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.


🔯 Netaji Subhas Chandra Bose jayanti status in marathi

    संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास केला, जो माझ्यात आधी नव्हता.
 

🎯 सुभाषचंद्र बोस जयंती फोटो मराठी

आईचं प्रेम हे स्वार्थ विरहीत आणि सर्वात निस्सीम असते. या प्रेमाचं मोजमाप कोणत्याही मापाने करता येत नाही.

 

💠 Shubhas chandra bose jayanti poster

आपल्या कॉलेज जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असताना मी अनुभवलं की, जीवनाचा काहीतरी अर्थ आणि उद्देश्य आहे.

🔶 Shubhas chandra bose jayanti images 

जीवनामध्ये प्रगतीचा आशय हा आहे की, निसंकोचपणे शंका उपस्थित करा आणि त्याचे समाधान मिळवण्याचा प्रयन्न करा.

♦️  netaji subhash chandra bose wishes in marathi

 सकाळचा पहिला काही वेळ अंधाराचा नक्की असतो. पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरु ठेवा.

🌐  Netaji Subhash Chandra Bose jayanti quotes

माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती. पण कठोर मेहनत टाळण्याची प्रवृत्तीही माझ्यात कधी नव्हती.


🔵 netaji subhash chandra bose celebration

फक्त मनुष्यबळ, पैसे आणि वस्तूंच्या दमावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही.


🔯 netaji subhas chandra bose photos

 आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे. जी आपल्याला साहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल.


🎯 नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती भाषण

लक्षात ठेवा की, अन्याय आणि चुकीच्या गोष्टींबाबत तडजोड करणे सर्वात मोठा अपराध आहे.


💠 नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती शायरी

 भारताच्या भाग्याबाबत निराश होऊ नका. जगात अशी कोणतीही शक्ती नाही, जी भारताला गुलाम बनवून ठेवू शकेल.


🔶 netaji Subhas chandra boseose jayanti speech

 भिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त आहे.

♦️ netaji subhash chandra bose information 

 स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये आपल्यात कोण टिकेल हे मला माहीत नाही. पण मला हे माहीत आहे की शेवटी विजय आपलाच होईल.


🌐 नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती विचार मराठी

 जीवनात शंका आणि सदेह सतत निर्माण होत राहिल्या पाहिजे आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. हाच जीवनाच्या प्रगतीचा अर्थ आहे.


🔵 netaji subhash chandra bose jayanti poster 

    आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.

🔯 नेताजी सुभाषचंद्र बोस banner in marathi

      मला आयुष्यातील एक निश्चित ध्येय साध्य करायचे आहे,त्या करिताच माझा जन्म झाला आहे, मला नैतिक विचारांच्या प्रवाहात जायचे नाही.

💠 नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती मराठी माहिती

   वेळेआधीच परिपक्वता येणे चांगले नाही, ते वृक्षांच्या बाबतीत असो अथवा व्यक्तींच्या, कालांतराने त्याचे परिणाम भोगावे लागतात.

♦️ netaji subhash chandra bose status in marathi

              कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात, त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.

 🌐 shubhas chandra bose quotes in marathi 

डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंतःकरणात स्वातंत्र्याचे वादळ, हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.

 🔶 नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती शुभेच्छा संदेश 

माझ्यावर कितीही संकटे आली तरी मी घाबरणार नाही, मी पळून जाणार नाही,मी त्याचा सामना करत पुढेजात राहील.

 

💠 Netaji Subhash Chandra Bose jayanti shubhechha

एवढं तर तुम्हीही मानत असालच की,एक ना एकदिवस मी तुरुंगातून मुक्त होईन,कारण प्रत्येक दुःखाचा अंत हा निश्चित आहे.



 हे सुध्दा वाचा ⤵️









FAQ

Q.1) नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणती घोषणा देत नागरिकांना प्रेरीत केले ?

Ans. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा" ही घोषणा देत नागरिकांना प्रेरीत केले.


Q.2) नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणाच्या मार्गदर्शनाखाली देशसेवेचे कार्य सुरू केले ?

Ans. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चित्तरंजन दास यांच्या मार्गदर्शनाखाली देशसेवेचे कार्य केले.


Q.3) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कधी झाला ?

Ans.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल असे सांगण्यात येते की १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजीचे निधन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad