google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 ९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती | 9 August Kranti din bhashan marathi pdf
Type Here to Get Search Results !

९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती | 9 August Kranti din bhashan marathi pdf

 ९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती | 9 August Kranti din bhashan marathi pdf | ऑगस्ट क्रांती दिन भाषण मराठी | क्रांतीदिन २०२२ मराठी माहिती | Kranti din speech essay in marathi

९ ऑगस्ट क्रांती दिन २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण ९ ऑगस्टला साजरा केला जाणारा दिवस म्हणजे क्रांती दिन याबद्दलची माहिती बघणार आहोत.
९ ऑगस्ट क्रांती दिन हा दिवस संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती. खालील लेखात दिलेली माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण मराठी pdf | 9 August Kranti din bhashan marathi pdf

             "आज सलाम आहे त्या वीरांना 
          ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
         ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी 
     जन्मलेल्या वीशंमुळे हा देश अखंड राहिला."

क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो.

७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टैंक मैदानावर (क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी मांडलेला 'छोडो भारत' ठराव प्रचंड, बहुमताने मंजूर झाला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधीजींनी जनतेला 'करेंगे या मरेंगे' या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आवाहन केले.

देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरूवात झाली. ब्रिटिश सत्ता हादरून गेली होती. आंदोलन देशभर पसरणार म्हणून ९ ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनेक नेत्यांना पकडून ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाहीत.

   'चले जाव' चळवळीला सर्व थरातून पाठिंबा मिळाला.  ज्यावेळी 'चले जाव' चळवळीचा जोर कमी होत आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागले होते त्याचवेळी भूमिगत चळवळ आकारास घेऊ लागली होती. बॉम्ब बनविणे, शस्त्रास्त्रे चालविण्याचे शिक्षण घेणे, गुप्त रेडिओ केंद्रे चालविणे इत्यादी कामे भूमिगत चळवळीतील नेत्यांनी केली. या चळवळीतील प्रमुख भूमिगत नेते म्हणून जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, गुसूफ मेहेरअली, सुचेता कृपलानी, एस.एम.जोशी, उषा मेहता इत्यादी नेत्यांचा उल्लेख करता येईल. सरकारी यंत्रणेला नुकसान पोहचविणे हे या चळवळीचे मुख्य शुभ होते.

देशाच्या काही भागांत ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन झाली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रतिसरकार विशेष गाजले. कारण दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेले आणि इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न दिलेले असे हे एकमेव प्रतिसरकार होते. ब्रिटिशांचे नीतीधैर्य खच्ची करण्यात प्रतिसरकारने महत्त्वाचा वाटा उचलला होता.

'चले जाव' चळवळीने आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे उ‌द्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की, त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हटले जाते..

'चले जाव' चळवळ म्हणजे परकीयांचे झू-जुगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळविण्याच्या रोखाने उचललेले एक भरभक्कम पाऊल होते. देशासाठी स्वप्राणाची बाजी लावण्याची लोकांच्या मनाची तयारी झाली होती. भारतीय जनता आपल्या विरोधात गेली असून आता आपण भारत देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली.

आपल्या भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व अमर हुतात्म्यांना माझे कोटी कोटी प्रणाम....





हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) क्रांती दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. क्रांती दिन ९ ऑगस्ट २०२२ रोजी साजरा केला जातो.

Q.2) क्रांती मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कधी सुरू झाले होते ?
Ans. ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टैंक मैदानावर (क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते. 

Q.3) महात्मा गांधीजींनी चले जाव आंदोलनाच्या वेळी जनतेला कोणते आव्हान केले होते ?
Ans. महात्मा गांधीजींनी चले जाव आंदोलनाच्या वेळी जनतेला करेंगे या मरेंगे असे आव्हान केले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad