Type Here to Get Search Results !

महालक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी | mahalaxmi margashirsha guruvar vrat katha

महालक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी  pdf | mahalaxmi Margashirsha Guruvar Vrat Katha | गुरूवारची महालक्ष्मीची कहाणी |श्री महालक्ष्मी व्रताची कथा मराठी pdf| shri mahalaxmi vratachi katha 

मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी :-  नमस्कार मित्रांनो आज आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी मध्ये बघणार आहोत. 

महालक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी  pdf

मार्गशीर्ष महिना चालू आहे व या महिन्यातील गुरुवार हे महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. मार्गशीर्ष  गुरुवारच्या दिवशी सर्व महिला महालक्ष्मीची पूजा, व्रत करतात व कथा वाचतात म्हणुनच आम्ही महिलांसाठी घेऊन आलो आहोत मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी मध्ये. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी pdf | Margashirsha guruvar vrat katha 


द्वापार युगातली ही गोष्ट.
त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता. तो मोठा विदवान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. त्यांना सात पुत्र व शामबाला नावाची एक कन्या होती ..

एकदा देवी लक्ष्मीच्या मनात आले कि आपण राजप्रासादी राहावे. त्यामुळे राजा आणखी सुखी होईल. प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सर्व संपत्तीचा उपभोग एकटाच घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे ल्याली. आधारासाठी काठी घेतली. काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या - दाराशी आली.

तिला पाहताच एक दासी पुढे आली..तिने म्हातारीला विचारले, "कोण ग बाई तू ?"कुठून आलीस ? काय काम काढलस ? तुझ नाव काय ? गाव काय ? काय हवं तुला ?" म्हातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली, "माझं नाव कमलाबाई. द्वारकेत, राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती ?"
दासी म्हणाली, "राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील ? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब."
म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, "तुझी राणी मागील जन्मी एका वैश्याची पत्नी होती.तो वैश्य फार गरीब होता. त्या दोघांची वारंवार भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. हया त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघून गेली. जंगलात एकटी उपाशी-तापाशी भटकू लागली. तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिली ऐश्वर्य, सुख व संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रतांची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने हे व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्रय संपले. घरात सुख-समृध्दी आली. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतरही ती दोघे पती-पत्नी हे लक्ष्मीलोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे.देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे."

म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले. नमस्कार केला. दासी तिला म्हणाली, "कृपा करून मला हे व्रत सांगा. उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही. "म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली. काठी टेकीत निघणार इतक्यात महालातून राणी तरातरा पुढे आली.
फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली. राणी उर्मटपणाने म्हणाली,  कोण ग तू थेरडे ? इथे का आलीस? जा इथून." तिने पुढे होऊन म्हातारीलां घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्रीमहालक्ष्मीच होती, हे राणीला कळले. नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले.

राणीचा महाल सोडून म्हातारी तेथून निघणार, तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला व कळवळून म्हणाली," आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते."राजकन्येचे हे बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली.

तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची आर्थिक स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. शामबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी तिने व्रत, केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले.

लवकरच शामबालेचा विवाह सिध्देश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा झाला. पण इकडे भद्रश्रवा राजा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले. त्यांचे राज्य लयास गेले. सगळे वैभव - ऐश्वर्य गेले. अन्न-पाण्यालाही ते महाग झाले. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. एकेक दिवस चितेंने उगवत होता व मावळत होता.

एक दिवस भद्रश्रवाला वाटले की, मुलीकडे जावे, तिला पहावे आणि ४-८ दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी थांबला. राणीची दासी नदीवर, येत होती. तिने भद्रनवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली.

मालाधर व शामबालेने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान-सन्मानाने राज- वाड्यात आणले. आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा व मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाडयात राहिला. आता घरी परत जायचा विचार त्याच्या मनात लोळ लागला. त्याने तसे जावयाला हे सांगितले. जावयाने संमती दिली.

भद्रश्रवा परत जायला निघाला तेंव्हा शामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाई-घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आता आत पाहते तर काय ?. हंडयात धन नव्हते. होते फक्त कोळसें ! महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. तिने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला.

दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्रय सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक-एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. पुढे एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी आली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरूवार होता.

सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहचली. तेंव्हा शामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करवून घेतले. चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका आपल्या गावी आली. राणीने लक्ष्मीव्रत केल्याने काही दिवसात त्यांना पूर्वीचे दिवस परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली.पुढे काही दिवसांनी आई- वडिलांना भेटण्यासाठी शामबाला माहेरी आली.

पण बाप भेटायला गेला असताना त्याला शामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शामबालेचे करावे तसे स्वागत केले नाही. राणीने एकप्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला व त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली.

स्वगृही आल्यावर मालाधराने तिला विचारले, “माहेराहून काय आणलस ?" शामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले. तर हंड्यात मिठाचे खडे । तो पत्नीला म्हणाला, "ह्याचा काय उपयोग?" शामबाला म्हणाली, "थोडे थांबा, कळेलय .

त्या दिवशी शामबालेने कोणत्याही पदार्थात मीठ घातले नाही. सगळे पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर त्याला सगळे पदार्थ वाढले. पानात बाजूला थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली.'ह्या मीठाचा हा उपयोग ! "शामबाला 66 पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले.

थोडक्यात, जो कोणी महालक्ष्मी व्रत श्रध्देने व मनोभावे करेल त्याला देवी प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर कोणी उतू नये. नित्य नेमाने मनोभावे महालक्ष्मी व्रत करावे. म्हणजे देवी तुम्हालाही प्रसन्न होईल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. 
अशी ही महालक्ष्मीची कथा.
कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ।।





हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू झाला आहे ?
Ans. मार्गशीर्ष महिना 24 नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे.

Q.2) मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार कधी आहे ?
Ans. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार 1 डिसेंबर रोजी आहे.

Q.3) महालक्ष्मी व्रताची कथा pdf download कोठे मिळेल ?
Ans. महालक्ष्मी व्रताची कथा pdf download हे www.marathimahila.com येथे मिळेल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad