google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 तुलसी विवाह कथा pdf मराठी | Tulsi Vivah katha pdf marathi 2022 | Tulsi Vivah marathi story
Type Here to Get Search Results !

तुलसी विवाह कथा pdf मराठी | Tulsi Vivah katha pdf marathi 2022 | Tulsi Vivah marathi story

 तुलसी विवाह कथा pdf मराठी | Tulsi Vivah katha pdf marathi |तुलसी विवाह मराठी कथा | Tulsi Vivah marathi katha | Tulsi Vivah marathi story | Tulsi Vivah 2022 

Tulsi Vivah 2022 :- नमस्कार मित्र हो, या लेखात तुलसी विवाह मराठी कथा ही अतिशय सुंदर मराठी कथा तुम्ही पाहणार आहात . या कथेची नायिका तुळशी हिचे नाव वृंदा असून ती राक्षस कुळातील असते. ती भगवान विष्णूंची परमभक्त असते. तिचे लग्न असुरराज जालंधरशी झालेले असते. वृंदा आपल्या पतीला देव व दानवांच्या युद्धात विजयासाठी उपवास करते देवतांनी केलेल्या विनवणीमुळे जालंधरचा कसा मृत्यू होतो व वृंदा कशी सती जाते ? तुळशीचा जन्म कसा होतो व तिचा विवाह का करतात ? याचे प्रभावी वर्णन या कथेत मी केले आहे. आशा आहे, तुम्हाला हा लेख नक्की
आवडेल.

तुलसी विवाह मराठी कथा pdf | Tulsi Vivah marathi katha pdf

तुलसी विवाह कथा :-

Tulsi Vivah 2022 :- तुळशी पूर्वजन्मी एक मुलगी होती. तिचे नाव वृंदा होते. ती राक्षस कुळात जन्मलेली होती. ती लहान पणापासून भगवान विष्णूंची परमभक्त होती.

वृंदा मोठी झाल्यानंतर तिचा विवाह राक्षसराजा जालंधर याच्याशी झाला. वृंदा ही एक पतिव्रता स्त्री होती. ती नेहमी आपल्या पतीची मनापासून सेवा करायची.एकदा देव व दानव याच्यांत युद्ध झाले. जालंधर युद्धाला जाताना वृंदा म्हणाली, जोपर्यंत तुम्ही युद्धावर असाल तोपर्यंत मी तुमच्या विजयासाठी उपासना करीन. तुम्ही परत येईपर्यंत मी माझा संकल्प सोडणार नाही.

त्यानंतर असुरराज जालंधर युध्दास गेले. इकडे वृंदा उपासनेस बसली. व्रताच्या परिणामामुळे देवांना जालंधरवर विजय मिळवता येईना. सर्व देव भगवान श्रीविष्णू याच्यांकडे मदतीसाठी गेले. तेंव्हा विष्णू म्हणाले, " वृंदा ही माझी परमभक्त आहे. मी तिला फसवू शकत नाही.

सर्व देव म्हणाले, "भगवान विष्णु,आम्ही तुम्हाला शरण आलो आहे. या संकटातून तुम्हीच आम्हाला वाचवू शकता." मग भगवान विष्णूने असुर राज जालंधरचे रूप घेतले व राज वाड्यात पोहचले. वृंदाने आपल्या पतीला पाहताच उपासना थांबवली.ती पूजेवरून उठली व तिने त्याच्या पायाला स्पर्श केला. तसा वृंदाचा संकल्प सुटला. देवतांनी जालंधरला ठार मारले.

जालंधरचे कापलेले डोके राजवाड्यात येऊन पडले. वृंदाला आश्चर्य वाटले. माझ्या नवऱ्याचे डोके कापले गेले आहे, मग समोर उभा असलेला , हा कोण आहे ? मग श्रीविष्णूने मूळ रूपात आले. वृंदाला सर्व काही समजले. तिने विष्णूला शाप दिला. पाहताक्षणी श्रीविष्णूचे पाषाणात रूपांतर झाले.

सर्व देवतांनी श्रीविष्णूला शापातून मुक्त करावे म्हणून वृंदाला प्रार्थना केली. वृंदाने श्रीविष्णूला शापातून मुक्त केले व आपल्या पतीसोबत सती गेली. काही दिवसांनी त्यांच्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली. भगवान विष्णूंनी तिचे नाव तुळस असे ठेवले.

भगवान विष्णू म्हणाले, हिचे आजपासून तुळस हे नाव असून माझ्या पाषाणरूपी स्वरुपाचे म्हणजेच शाळीग्रामचे तुळशीसह पूजन केले जावे. तुळशीशिवाय माझी केलेली पूजा मला मान्य नाही.

तेंव्हापासून सर्वजण कार्तिक महिन्यात तुळशीचे शालीग्राम म्हणजेच भगवान श्रीविष्णूंनी लग्न लावतात.



तुलसी विवाह कथा pdf हिंदी | Tulsi Vivah katha pdf in hindi

Tulsi Vivah 2022 :- तुलसी (पाँध) की उत्पत्ति कैसे व क्यों हुई इसका एक दृष्टांत पौराणिक कथा में आता है। पौराणिक कथानुसार एक बार दैत्यराज जालंधर के साथ भगवान विष्णु को युद्ध करना पड़ा। काफी दिन तक चले संघर्ष में भगवान के सभी प्रयासों के बाद भी जालंधर परास्त नहीं हुआ।

अपनी इस विफलता पर श्री हरि ने विचार किया कि यह दैत्य आखिर मारा क्यों नहीं जा रहा है। तब पता चला की दैत्यराज की रूपवती पत्नी वृंदा का तप-बल ही उसकी मृत्यु में अवरोधक बना हुआ है। जब तक उसके तप-बल का क्षय नहीं होगा तब तक राक्षस को परास्त नहीं किया जा सकता।

इस कारण भगवान ने जालंधर का रूप धारण किया व तपस्विनी वृंदा की तपस्या के साथ ही उसके सतीत्व को भी भंग कर दिया। इस कार्य में प्रभु ने छल व कपट दोनों का प्रयोग किया। इसके बाद हुए युद्ध में उन्होंने जालंधर का वध कर युद्ध में विजय पाई।

पर जब वृंदा को भगवान के छलपूर्वक अपने तप व सतीत्व को समाप्त करने का पता चला तो वह अत्यंत क्रोधित हुई व श्रीहरि को श्राप दिया कि तुम पत्थर के हो जाओ। इस श्राप को प्रभु ने स्वीकार किया पर साथ ही उनके मन में वृंदा के प्रति अनुराग उत्पन्न हो गया।

तब उन्होंने उससे कहा कि वृंदा तुम वृक्ष बन कर मुझे छाया प्रदान करना। वही वृंदा तुलसी रूप में पृथ्वी पर उत्पन्न हुई व भगवान शालिग्राम बने। इस प्रकार कार्तिक शुक्ल एकादशी को तुलसी शालिग्राम का प्रादुर्भाव हुआ । देवउठनी से छह महीने तक देवताओं का दिन प्रारंभ हो जाता है। अतः तुलसी का भगवान श्री हरि विष्णु शालीग्राम स्वरूप के साथ प्रतीकात्मक विवाह कर श्रद्धालु उन्हें वैकुंठ को विदा करते हैं।

तुलसी विवाह कथा pdf ( Tulsi Vivah katha pdf) ➡️ DOWNLOAD PDF


हे सुध्दा वाचा ⤵️

FAQ
Q.1) तुलसी विवाह कधीपासून सुरू होत आहे ?
Ans. तुलसी विवाह 5 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होत आहे.

Q.2) तुलसीचे पुर्वजन्मीचे नाव काय होते ?
Ans. तुलसीचे पुर्वजन्मीचे नाव वृंदा हे होते.

Q.3) तुलसी विवाह कधी व कसा होतो ?
Ans. तुलसी विवाह 2022: कार्तिक महिन्याच्या एकादशीला तुळशीविवाह केला जातो. या एकादशीला देवूठाणी एकादशी असेही म्हणतात. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. या दिवशी विष्णू स्वरूप शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह होतो.

Q.4) तुलसीचा (वृंदाचा) विवाह कोणाबरोबर झाला ?
Ans. वृंदा मोठी झाल्यानंतर तिचा विवाह राक्षसराजा जालंधर याच्याशी झाला. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad