Type Here to Get Search Results !

महालक्ष्मी व्रत कथा पुजा मराठी माहिती | mahalakshmi vrat Katha puja marathi mahiti

 महालक्ष्मी व्रत कथा पुजा नियम मराठी माहिती |mahalakshmi vrat Katha puja niyam marathi mahiti



नमस्कार मित्रांनो आज आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत पुजा, कथा आणि नियमाबद्दलची माहिती बघणार आहोत.

 मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार हा 9 डिसेंबर,16 डिसेंबर,23 डिसेंबर आणि 30 डिसेंबरला येतो आणि या चारही गुरुवारी आपण महालक्ष्मीचा पूजा विधी करतो.

मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मराठी 2021

श्रीमहालक्ष्मीव्रताची कथा ऐकावी भक्तांनो (गुरुवारची कहाणी) ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्रय दूर होते. श्रीमहालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती, ऐश्र्वर्य, वैभव प्राप्त होते. मनातील ईच्छा पूर्ण होते. 

सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, क्षान्ती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, वृत्ती, कांती, स्मृती, द्या, तुष्ठी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपांनी राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधूकण्या, स्वर्गात महालक्ष्मी, भुलोकी लक्ष्मी, ब्रम्हलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेमारी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनि पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददंती,
केतकीवनी सुशीला, कदंबवनी कदंबमाला, राजप्रासादी राजलक्ष्मी घरोघरीध गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी सर्वाच्या परिचयाच्या व सार्वभुमी असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ही कहाणी आहे.

द्वापारयुगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता चार वेद, सहा शास्त्रे, आंठरा पुराणे ह्यांचे ज्ञान त्याला होते. त्याला मुरतचंद्रका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले. त्या राजाच्या राजप्रासादी रहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती सर्वात:करताच खर्च करील. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरतचंद्रीका राणीच्या महासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध बाम्हणीची नीट विचारपुस केली.



वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी महणाली, "बाळ माझे नाव कमळा. माझ्या पतीचे नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची मांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी, ह्या जाचाला त्रासलेली ती वैश्यपली कंटाळली आणि घर सोडून गेली. रानीवनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख व समुद्री देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. 

माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिच घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलं. तिच्या जीवनात आनंदीआनंद आला. पुढे ते पतिपत्नी निधन पावले. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मीलोकात वैभवात राहिली. ज्यांनी जितकी वर्ष श्रीमहालक्ष्मीव्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. ह्या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे.

वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला म्हणाली, "माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा." वृद्धेच्या रुपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतःपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐचर्याचा फार गर्व झाला होता. संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने वातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. 

ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती. हे कही राणीला कळाने नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरविले. ती राजदरबारातून निघाली. वाटेत तिला श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकिकत कळली. तिने त्या वृद्ध आह्मणीची क्षमा मागितली, तेव्हा श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मीची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने  महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य,ऐश्र्वर्य, वैभव, सर्व गेले व त्यांची अन्नान्नदशा झाली. 

एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, "आपला जामात राजा आहे. खूप श्रीमंत आहे. त्यांच्याकडे जा. आपले हाल सांगा. त्याला दया येईल. तो आपल्याला साह्य करील." त्याप्रमाणे मद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या  काठी असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकिकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्यत्रे  पाठवून श्यामवालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदरसत्कार केला. नानापरीचा पाहुंचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सुरतचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते. कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकुमेने हा चमत्कार घडून आला होता.

काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मीव्रत केले. आईकडूनही करविले. सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राजऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. परंतु 'बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही' हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागावता ती तेथून निघाली. निघताना तिने तेथिल थोड़े मीठ बरोबर घेतले. 

आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, "माहेरून काय आणले ?" ती म्हणाली, "राज्याचे सार आणले." पती म्हणाला "म्हणजे काय ?" पत्नी म्हणाली, "थोडा धीर धरा म्हणजे कळेन." त्या दिवशी तिनं सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणीलागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागते. "हेच ते राज्याचे सार!" श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हस्यविनोद करून जेवण पुरे केले. अशा रितीने जे कोणी हे महालक्ष्मीव्रत श्रद्धेने पुर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुखसमृद्धी व शांती ह्यांचा लाभ होईल. सकळ मनोरचे पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, श्रीमहालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये, दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये.

"महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना' अशी ही श्रीमहालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण

 ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्यै नमः। ॐ न्हीम् श्रीलक्ष्मीभ्यो नमः। ॐ शांतिः शांतिः शांतिः। श्रीमहालक्ष्मी देवतार्पणमस्तु !

हे सुद्धा वाचा⤵️

FAQ
Q.1) मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार कधी आहे ?
Ans.मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार 16 डिसेंबरला आहे.
Q.2) महालक्ष्मीची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने काय 
होते ?
Ans. महालक्ष्मीची कथावाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्रय दूर होते. श्रीमहालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती, ऐश्र्वर्य, वैभव प्राप्त होते. मनातील ईच्छा पूर्ण होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad