Type Here to Get Search Results !

खंडोबा नवरात्र चंपाषष्ठी पुजा विधी मराठी| | Khandoba navratri puja vidhi in marathi

 खंडोबा नवरात्र चंपाषष्ठी पुजा विधी मराठी | Khandoba navratri puja vidhi champashashti mahatva in marathi

       


नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण खंडोबाची पूजा विधी, उपासना कशी करावी, चंपाषष्ठी महत्व, नैवेद्य कोणता द्यावा आणि खंडोबाची तळी कशी भरावी याबद्दलची माहिती बघणार आहोत.

अनुक्रमणिका(toc)

खंडोबा चंपाषष्टीचे महत्व

 खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत, यांचा निवास आहे महाराष्ट्रातील जेजुरी गडावर. या खंडोबाच्या हातात खांडा नावाची तलवार होती म्हणूनच त्यांचे नाव पडले खंडेराया किंवा खंडोबा. 

 खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार आणि अशा या खंडोबाचा उत्सव म्हणजेच खंडोबाचं नवरात्र आणि चंपाषष्ठी जस देवीच नवरात्र असत तसच खंडोबाच असत पण ते षडरात्र म्हणजे सहा दिवस व रात्र असतं तर असे हे मल्हारी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी सुरु होते.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासुन ते शुध्द षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते.षष्ठी म्हणजे सहा असा हा सहा दिवसांचा उत्सव जेजुरीला मोठ्या प्रमाणात व अतिशय भक्तिभावाने साजरा होतो. जेजुरी प्रमाणेच खंडोबाच्या इतर देवळातही हा उत्सव साजरा केला जातो.




खंडोबा नवरात्र कथा

 आता आपण हा उत्सव का साजरा केला जातो त्यामागची कथा जाणुन घेऊया. मार्तंड भैरवाने आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला आणि भूतलावरील मोठे अरिष्ट टळले. 

त्याच्याच विजयोत्सवात देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडाऱ्या बरोबरच चंपाषष्ठी म्हणजेच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली म्हणुनच मार्गशीर्ष शुध्द षष्ठीला चंपाषष्ठी हे नाव मिळाले आणि या उत्सवाची सुरुवात झाली.


खंडोबा चंपाषष्टी कशी साजरी करावी

खंडोबाचा वार रविवार म्हणून शक्यतो त्याच दिवशी हे कुलाचार करतात कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. आता हा खंडोबाचा टाक कसा असतो तर यात घोडा आणि खंडोबा असतो या टाकाची स्थापना नवरात्रात केली जाते. 

नवरात्रप्रमाणेच माळा वाढवत घटावर फुलांच्या माळा लावल्या जातात. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. देवाला बेल, दवणा, चाफ्याची आणि झेंडूची फुले वाहिली जातात. सहा दिवस नंदादीप लावतात.

खंडोबा नवरात्र करण्याची पध्दत कोणाकडे टाक असतो तो बसवला जातो, कोणाकडे खंडोबाची मूर्ती असते, कोणाकडे कलश असतो कलशावर ताम्हण ठेवून त्यात तांदूळ पसरतात व त्यावर खंडेरायाची मूर्ती स्थापना केली जाते. 

कोणाकडे माळाबंधन असते म्हणजे काय तर विडयाच्या पानांच्या किंवा झेंडूच्या माळा सोडल्या जातात. काही जणांकडे उपवास केले जातात. जागरण गोंधळ असतो, तळी आरती सुध्दा असते.

 ➡️ खंडोबाचे लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा


खंडोबाला नैवद्य कोणता द्यावा

 प्रथम देवघरातील सर्व देवांची पंचामृताचा म्हणजेच (साखर, दही, दूध, तूप, मध) या मिश्रणाचा अभिषेक करून पूजा करून घ्यावी. त्यानंतर कलश, घंटा, गणपती, शंख, यांची पूजा करावी. 

प्रथम हळदीकुंकू वाहून मग फुले वहावीत. कलशात सुपारी फूल अक्षता वहाव्यात आणि मग त्यात विड्याची पाने ठेवावीत. नारळाला हळदी कुंकू वाहून तो कलशावर ठेवावा. कलशाखाली अक्षता ठेवून मग त्यावर कलश ठेवावा. त्यानंतर गणपतीची पूजा करावी यासाठी गणपती ताम्हनात घ्यावा.

 हळदकुंकू अक्षता वाहून दुधाचा अभिषेक करावा, नंतर पाणी घालून पुसून घ्यावा. मग गणपती जागेवर ठेवून हळदीकुंकू, फुले ववाहीत नंतर खंडोबाचा टाक ताम्हनात घ्यावा दुध व पाण्याचा अभिषेक करून पुसून घ्यावा नंतर एक विड्याचे पान घेऊन त्यावर स्वस्तिक काढावे आणि त्यावर तो टाक ठेवावा. हळदीकुंकू वहावे.

 हळद जास्त वहावी कारण खंडोबाला हळद जास्त प्रिय आहे. पिवळे फूल वहावे.नंदादीप लावावा, तो सहा दिवस ठेवावा आणि तळी आरती करावी. आता आपण तळी आरती म्हणजे तळी भरण्याचा विधी पाहूया.

हे सुद्धा वाचा⤵️


खंडोबाची तळी कशी भरावी

खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजेच (हळदीची पूड) फार महत्वाची आहे. देवाला नैवद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. आता हा विधी घरी देवासमोर कसा करावा ते पाहू.

ताम्हनामध्ये विड्याची किंवा नागिणीची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा म्हणजेच हळदेची पूड हे साहित्य घेऊन तीन, पाच, सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन "सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणत ताम्हण उचलावे.

 त्यानंतर पानाचा विडा ठेवून म्हणतात (काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल भुवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवतात. एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणाऱ्या प्रत्येका पुढे एक एक विडा ठेवाला जातो.

 देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा हा लावतात. त्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते आणि शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते नंतर बुधली आणि दिवटी घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो. आता आपण त्या दिवशी नैवद्याच्या जेवणाची माहिती घेऊया.

 खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी दिवशी ठोंबरा (म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात) तर असा ठोंबरा पुरणा वरणाचा नैवद्य कणकेचा रोडगा किंवा बाजरीचा रोडगा वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसुन या सर्वाचा नैवद्य करावा. 

खंडोबाची तळी भरण्याची आरती  Click here 

तळीचे ताट कसे सजवावे

 या ताटात पाच बाजरीचे रोडगे घ्यावेत त्यावर वांग्याच भरीत घालाव. एका ताटात पाच विछ्याची पाने ठेवून खोबऱ्याचे तुकडे, भंडारा व रुपया ठेवावा. ऊस असल्यास पाच ऊसाची झोपडी करावी अस हे नैवद्याचे तळीचे ताट तयार झाल्यानंतर घोडा, गाय, कुत्रा यांना नैवद्याच्या ताटातील पास द्यावा.

घटस्थापना करून नातलांगाना सोबत घेऊन तळी भंडारा कराव. उपस्थितांना भंडारा लावून पानसुपारी खोबरे द्यावे. अशा रितीने या चंवाषष्ठीच्या निमित्ताने खंडेरायाच नवरात्र साजरं केलं जातं आणि खंडेरायाची उपासना केली जाते.

FAQ
Q.1) महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाचे नाव खंडोबा असे का पडले ?
Ans.खंडोबाच्या हातात खांडा नावाची तलवार होती म्हणूनच त्यांचे नाव पडले खंडेराया किंवा खंडोबा असे पडले. 

Q.2) खंडोबा यांचे निवासस्थान कोठे आहे ?
Ans.खंडोबा यांचे निवासस्थान जेजुरी येथे आहे.

Q.3) खंडोबाची तळी भरण्याची आरती कशी आहे ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad