Type Here to Get Search Results !

वसुंधरा दिन भाषण निबंध मराठी माहिती | earth day 2022 speech essay in marathi

 वसुंधरा दिन भाषण निबंध मराठी माहिती | earth day 2022 speech essay in marathi | माझी वसुंधरा अभियान निबंध मराठी | vasundhra din marathi mahiti nibandh


वसुंधरा दिन भाषण निबंध मराठी माहिती


जागतिक वसुंधरा दिन २०२२ : नमस्कार मित्रांनो दरवर्षी आपण २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन (earth day 2022) म्हणून साजरा असतो. 

वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वसुंधरा दिन भाषण, निबंध, मराठी माहिती. ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

माझी वसुंधरा अभियान | माझी वसुंधरा भाषण मराठी माहिती | mazhi Vasundhara abhiyan bhashan marathi


             चला उठा, चला आता घेऊ
                      हा नवा प्रण...
             पर्यावरणाच्या रक्षणासाठी 
            राबवू माझी वसुंधरा अभियान
                    घेऊ हा नवा प्रण...
             पर्यावरणाच्या रक्षणासाठी
             राबवू माझी वसुंधरा अभियान 
                घेऊ काळजी करू जतन 
             पर्यावरणाचे रक्षण हेच वचन!!
   
        सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान अतिथीवर्ग, अध्यक्ष, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र आणि महिला भगिनींनो आज मी तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही नम्र विनंती !
        सर्वप्रथम आपणा सर्वांना जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

आपल्या अवतीभवती असलेल्या पर्यावरणीय घटकांमध्ये होत असलेले बदल, पर्यावरणाच्या जतना संदर्भात आपल्याकडून विकासाच्या नावाखाली कळत नकळत होणारी चूक आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक पर्यावरणीय समस्या विचारात घेत आज आपल्याला आपल्या वसुंधरेला वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने "माझी वसुंधरा" अभियान या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली असून या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक, प्रत्येक संस्था यांना स्वच्छ व सुंदर पर्यावरणाप्रती सजग व कृतिप्रवण केले जाणार आहे.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात झाली आहे. जल पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन तलावांसह सार्वजनिक विहिरीची स्वच्छता रेनवॉटर हार्वेस्टिंग, असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

 अग्नी तत्त्वांनुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर व बचत, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जेवर एलईडी दिवे लावण्याचे नियोजन आहे विद्युत वाहनांकरिता चार्जिंग पाइंट निर्माण करण्यात येणार आहे. आकाश तत्वानुसार स्थळ आणि प्रकाश या स्वरुपात मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार व प्रचार केला जाणार आहे पृथ्वी पंचतत्त्वांनुसार सामाजिक वनीकरण वनसंवर्धन घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन नवीन हरितक्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी केले जाणार आहे.

आपण आपल्या पर्यावरणाचे जतन व संवर्धन केले तरच आपली वसुंधरा आरोग्यसंपन्न, स्वच्छ, हरित, सुंदर व स्वस्थ राहणार आहे. आणि म्हणूनच "माझी वसुंधरा अभियान" आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देत पर्यावरणाची काळजी घेण्याची हाक देते. छोट्या छोट्या कृतींमधून आपण स्वतः पासून सुरुवात करून आपल्या वसुंधरेचे आरोग्य अबाधित राखू शकतो आणि म्हणूनच चला...... या अभियानात सहभागी होऊ या आणि आपल्या वसुंधरेला पर्यावरण पूरक बनवूया! आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे आरोग्य व अस्तित्व अबाधित राखू या....!!!



जागतिक वसुंधरा दिन निबंध मराठी माहिती | World earth day essay in marathi mahiti | माझी वसुंधरा दिन निबंध मराठी माहिती


22 एप्रिल वसुंधर दिन पृथ्वीची आज स्थिती खरोखरच दयनीय झाली आहे. सर्व बाजूंनी सुरू असलेल्या निसर्गाचा ह्यास, प्रचंड प्रमाणात वाढवणारी लोकसंख्या वाढत्या औद्योगिकीकरणाचा परिणाम यामुळे पर्यावरणाची घडीच विस्कटून गेली आहे.

पृथ्वीचे एक नाव आहे क्षमा आहे आणि तिच्या क्षमाशील वृत्तीचा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मानवाने फार मोठा गैरफायदा घेतला आहे. 21 व्या शतकात वाटचाल करणाऱ्या आणि राहणीमानात स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या मानवाने सृष्टीचे स्वरूपच बदलून टाकले आहे. आज हवा, पाणी, ध्वनी, जमिनीच्या प्रदूषणामुळे सजीवांचा जीवच धोक्यात आला आहे. आज मनुष्य हरतऱ्हेने निसर्गाचे शोषण करीत आहे.

वनस्पती, प्राणी, नैसर्गिक साधन संपत्ती आणि जैविक विविधता यांनाच आज मानवाने आपले लक्ष केले आहे. अणुबॉम्बच्या चाचण्या, शेतीवरील कीटकनाशकांची फवारणी, अनु स्पोट, फ्रीज मधून बाहेर पडणारा वायु आणि त्यामुळे पृथ्वीच्या बाहेरील कवचातील होणारे जल, वायूप्रदूषण, जमिनीची होणारी धूप यामुळे पृथ्वीमाता जर्जर झाली आहे.

औद्योगिक करणामुळे आम्ल पावसाचा धोका वाढतो आहे. प्रदूषणाचा फास गळ्याभोवती अवळायला लागल्याने लोकांचा जीव घुसमटायला लागला आहे. पृथ्वी भोवती असणाऱ्या ओझोनच्या थराला भगदाड पडत आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात सातत्याने वाढ होत आहे.

प्रदूषणाच्या विलख्यामुळे निसर्ग आपले काम चोख बजावेल अशा काही खुणा दृष्टीपथात येऊ लागल्या आहेत. पृथ्वीचे वाढते तापमान, त्यातून बर्फ वितळवून जलप्रलय होण्याचा धोका, ओझोन वायूचा विरळ होत जाणारा थर, भूकंप, ऍसिड रेन, ही संकटे मानवाच्या डोक्यावर लटकत्या तलवारीप्रमाणे घोंगावत आहेत.

या सर्व प्रश्नांवर विचार करण्यासाठी जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघ युनो च्या वतीने ब्राझीलमध्ये पृथ्वी परिषद भरविण्यात आली. सर्व राष्ट्रांचे लक्ष या वसुंधरेच्या ह्यासाकडे वेधण्यात आले. ह्या परिषदेत महत्त्वाचा प्रश्न असा होता की स्वतःच्या राष्ट्राचा विकासाबरोबर पर्यावरणाचा नाश होणार नाही याची प्रत्येक राष्ट्राने खबरदारी घ्यावी.

आज विकासाच्या नावाने जेवढा विनाश व उधळपट्टी होत आहे. त्याला प्रतिबंध घातला नाही, थांबवले नाही तर सर्व सजीवांच्या दुःख दैना अधिकच वाढतील. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे शहरीकरण, औद्योगिक करण व शेतीचे रासायनिक करण, वाढती लोकसंख्या यामुळे हवा, पाणी व अन्न साखळी कमालीची प्रदूषित झाली आहे. त्यासाठी पर्यावरण नियोजनाची आज गरज भासू लागली आहे.

वृक्षलागवड वृक्षारोपण पर्यावरणातील उष्णतेचा उंच उच्चक कमी करतो. अनु चाचण्या कमी करणे, खजिन साठा, जलसंपत्तीचा काटकसरीने वापर करणे, लोकसंख्या कमी करण्याचे उपायांचा वापर करणे गरजेचे झाले आहे..

अक्षरशा आपण बॉम गोळ्यांवर बसलेलो आहोत या वास्तवाचा प्राधान्यक्रमाने व गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच वसुंधरा दिनी पर्यावरणाचे संतुलन राखण्याची प्रतिज्ञा करूया.



हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला 
जातो ?
Ans. जागतिक वसुंधरा दिन २२ एप्रिल या दिवशी साजरा केला जातो.

Q.2) माझी वसुंधरा अभियान काय आहे ?
Ans. पर्यावरणाचे जतन व संवर्धन केले तरच आपली वसुंधरा आरोग्यसंपन्न, स्वच्छ, हरित, सुंदर व स्वस्थ राहणार आहे आणि म्हणूनच "माझी वसुंधरा अभियान" आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देत पर्यावरणाची काळजी घेण्याची हाक देते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad