Type Here to Get Search Results !

अहिल्याबाई होळकर भाषण निबंध मराठी माहिती | Ahilyabai Holkar bhashan nibandh marathi

 अहिल्याबाई होळकर भाषण निबंध मराठी माहिती | Ahilyabai holkar bhashan nibandh marathi |पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मराठी माहिती

अहिल्याबाई होळकर भाषण निबंध मराठी माहिती


अहिल्याबाई होळकर जयंती २०२२ : नमस्कार मित्रांनो आज आपण येणाऱ्या ३१ मे ला येणारी अहिल्याबाई होळकर यांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते.

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अहिल्याबाई होळकर भाषण निबंध कविता मराठी आणि ही सर्व माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


अहिल्याबाई होळकर भाषण निबंध मराठी | Ahilyabai holkar bhashan nibandh marathi

आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, सुजाण देशवासी असलेले बंधू आणि भगिनींनो, आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा अणि अभिमानाचा दिवस आहे. आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. आज मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी माझे विचार व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ! ही माझी नम्र विनंती..

            होळकरांची सुन होती बहुगुणी !
          शिक्षणाची ओढ होती लहानपणी !!
         गरज ओळखूनी सुखावले सर्व जनी ! 
         अशी जाहली दूरदृष्टी एक मर्दानी !!

मराठ्याच्या इतिहासामध्ये अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले पण त्यामधील अहिल्याबाई होळकर यांचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईना 'पुण्यश्लोक' असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे.

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसताना ही त्यांच्या वडीलांनी त्यांना लिहण्या-वाचण्यास शिकवले होते. अहिल्याबाई होळकर यांचा विवाह बाजीराव पेशवे यांचे एक सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाला. मल्हारराव होळकर हे मावळा प्रांताचे सुभेदार होते. अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर इ.स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईना सती जाऊ दिले नाही. मल्हारराव होळकर यांचा १२ वर्षानंतर म्हणजेच २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे एका मोहिमेतर असतांना त्यांना मृत्यू झाला.

सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार अहिल्याबाई होळकर बघू लागल्या. त्यांच्या पश्चात अहिल्याबाईनी आलमपुरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली. अति दक्षतेने अहिल्याबाई होळकर यांनी २८ वर्षे राज्यकारभार चालविला. शत्रू देखील त्यांच्याबद्दल आदर बाळगत असत. मंदिरांची पुनर्बाधणी, जीर्णोधार, देवतांची प्रतिष्ठापणा तसेच घाट- रस्ते, धर्मशाळा बांधणे, अन्नछत्रे चालविंगे या लोकोपयोगी कामामुळे संपूर्ण भारतभर अहिल्याबाईंचे नाव अजरामर झाले.

अहिल्याबाई होळकर बालपणाची गोष्ट -
एकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेल्या होत्या तेथे नदीच्या वाळूत खेळतांना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढ्यात सैन्य दलातील एकाचा घोडा उधळला उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊन पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तीने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून शिवलिंगाचे रक्षण केले.

तेवड्यात पाठीमागून आलेल्या श्रीमतांनी थोड्याशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले की, पोरी तुला घोड्याने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतावर रोखत म्हणाली की, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे तिचे बाणेदार उत्तर ऐकूण श्रीमंत तर खूष झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोट्या अहिल्येला आपली सून करून घेतली.अहिल्याबाईनी देखील मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला. व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पसरविली.

अहिल्याबाई होळकर या आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभीमानी, दक्ष व धर्मकारणात सर्वस्व दानी होत्या. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या. त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने रयतेची मने जिंकली. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाले.

शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन पुरुष जातीचा बडगा छेदून केलीत तुम्हीं समाजसेवा ! भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा !! जात-धर्म विसरुन दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा ! 'अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा !!!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन जय भारत! जय मल्हार ! 
धन्यवाद !






FAQ
Q.1) अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कधी झाला ?
Ans. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या खेड्यात झाला.

Q.2) अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
Ans. अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे हे होते.

Q.3) अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू कधी झाला ?
Ans. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad